Tuesday, February 6, 2018

पाच दिवसांत  साडेतीन हजार
क्विंटलपेक्षा  अधिक  तूर खरेदी
सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख
मुंबई, दि. 5 : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे.आजपर्यंत १६० तूरकेंद्रांवर ३३९ शेतकऱ्यांची ३७५५.६१ क्विंटल तूर खरेदी  करण्यात आली, अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदी केंद्रावर साधारणत १लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तूर खरेदी तीन महिने चालणार असून आजचा पाचवा दिवस आहे.तूर खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद असून तूर खरेदीसाठी उपलब्ध खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेतअसेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
 तूरखरेदी साठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून त्यासाठी NELM पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नयेयासाठी मंडळस्तरावर अथवा मोठ्या गावामध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधारकार्डची छायाकींत प्रतसुरू असलेल्या बँक खात्याचे पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेक)सातबारा उतारा आदी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे ऑनलाईन बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे बँक खात्याची नोंदणी अचूक करावी.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.
००००



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...