Monday, November 13, 2017

महाविहार बावरी नगरची कामे दर्जेदार करावीत
- पालकमंत्री अर्जुन खोतकर
नांदेड, दि. 13 :- महाविहार बावरीनगर दाभड येथील तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित असलेली उर्वरीत कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले.
अर्धापुर तालुक्यातील बावरीनगर दाभड येथील तिर्थक्षेत्राच्या विविध विकास कामांबाबत जिल्हास्तरीय सिकाणु समितीची बैठक पालकमंत्री श्री खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी आमदार हेमंत पाटील, सिकाणु समितीचे कार्यकारी अध्यक्ष एस. पी. गायकवाड, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. टी. बडे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार अरविंद नरसीकर, समाज कल्याण सहायक आयुक्त भगवान वीर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. खोतकर यांनी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत महाविहार बावरीनगर दाभड येथील मुख्य ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, प्रवेशद्वार, अशोकस्तंभ, प्रशासकीय इमारत, यात्री निवास, संरक्षण भिंत, ट्रान्सफार्मर व महावितरण खर्च, अंतर्गत रस्ते, बागबगीचा, सायकल स्टँड, कार पार्कींग आदी कामांचा आढावा घेतला. उर्वरीत कामांमध्ये दिरंगाई होणार नाही यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात यावी. प्रत्यक्ष झालेल्या कामांची पाहणी करण्यात येईल. शासनस्तरावरील मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी अभियंता श्री. बडे यांनी झालेल्या व सुरु असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...