Monday, November 6, 2017

"निवडणूक ज्ञान स्पर्धेत"
विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा

नांदेड, दि. 6 :-  भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक ज्ञान स्पर्धा 2017-18 साठी आंतर शालेय फेरी 1 ते 10 नोव्हेंबर, जिल्हास्तर फेरी 11 ते 17 नोव्हेंबर, राज्यस्तर फेरी 20 ते 25 नोव्हेंबर, उपांत्य व अतिंम फेरी 11 ते 17 डिसेंबर 2017 या कालावधीत होणार आहेत. जिल्ह्यात ही स्पर्धा प्रत्येक तालुक्यात शालेय स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.  
अखिल भारतीयस्तरावर 14 ते 17 या वयोगटातील 9 वी ते 12 वीतील व भविष्यात नव मतदार म्हणून नोंदणी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा निवडणूक प्रक्रिया या विषयाबाबत होणार असून स्पर्धेच्या 5 फेऱ्या होणार आहेत.
प्रथम फेरी शालेयस्तरावर घेण्यात येणार असून या फेरीमध्ये भाग घेतलेल्या सर्व शाळांमधील पात्र ठरलेले प्रत्येक दोन विद्यार्थी जिल्हा स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरणार आहे. शालेय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करताना मुलींचा सहभाग असेल याची पुरेशी दक्षता घेण्यात येणार आहे.
दुसरी फेरी जिल्हास्तरावर होणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
जिल्हा स्तरावरील फेरीमध्ये जिंकणाऱ्या शालेय चमूला राज्य स्तरीय तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात येईल. चौथी व पाचवी फेरी ही राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे भारत निवडणूक आयोग आयोजित करणार आहे.
शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका व जिल्हा स्तरीय फेरीसाठी प्रश्नावली भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने समितीची स्थापना केली असून जिल्ह्यातील शाळांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय फेरीसाठी आदर्श प्रश्नपत्रिका तसेच जिल्हास्तरीय फेरीसाठी प्रत्येक शाळेकडून ठरवून दिलेल्या चमुची यादी स्विकृत करणे. भारत निवडणूक आयोगाकडून पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नोत्तर त्यांचे मुल्यमापन करण्यासाठी तज्ज्ञांचा एक संघ तयार करणे, जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन, अध्यक्षपद स्विकारणे, मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय फेरीचे ऑडिओ / व्हिडीओ करुन तज्ज्ञ संस्थेला पाठविण्यात येणार आहे.  
जिल्हास्तरीय फेरीत विजेता असलेल्या चमुची नावे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पुढील फेरीसाठी कळविण्यात येणार आहेत. राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या व भाग घेणाऱ्यांना प्रवास व इतर सवलती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टी-शर्ट तयार करुन पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयात राष्ट्रीय मतदार दिवशी कार्यक्रमात जिल्हास्तरीय विजेता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.  
तालुकास्तरीय समितीकडून प्राप्त होणारे विजेत्यातून जिल्हास्तरावर 11 ते 17 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे नियोजन, तसेच स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करणे व त्याच दिवशी स्पर्धेतील विजेता घोषित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

 000000  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...