Saturday, November 11, 2017

शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तुतीची लागवड करावी
 --- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 11:- दिनांक 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2017 या कालावधीत महारेशीम -2018 राबविण्यात येत आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 50 गावांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच तुती लागवड उद्योग हा पर्यावरणपुरक आहे. शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसाय म्हणून तुतीची लागवड करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की,  भारत रेशीम धागा आयात करत आहे. रेशीम धाग्याची उत्पादन क्षमता वाढवून आपली गरज भागविण्यासोबतच अन्य देशांनादेखील मागणीप्रमाणे रेशीम धागा पुरविण्याची संधी भारताला आहे, काही शेतकऱ्यांनी पंधरा वर्षा पूर्वी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून रेशीम शेतीचा पर्याय निवडला आहे. रेशीमची मागणी पाहता उत्पादन फक्त देश पातळीवर 15% आहे. शेतकरी रेशीम शेती करत आहे, असे जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
महा-रेशीम  अभियान -2018  संबंधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यशाळा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन , प्रेक्षागृह जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपन्न झाली .
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, भोकर येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्षिरसागर, उपजिल्हाधिकारी श्री.कांबळे, रेशीम विकास अधिकारी पी. जे. पाटील, रेशीम विकास अधिकारी श्री. ढावरे, वैज्ञानिक डी. परभणी ए. जे. कारंडे, प्रकल्प अधिकारी, रेशीम पी. बी. नरवाडे, तहसीलदार किरण अंबेकर, अर्धापूर तहसीलदार अरवींद नरसीकर, मुदखेड तहसीलदार सुरेश घोळवे, देगलूर प्र. तहसीलदार वसंत नरवडे, तसेच प्रगतीशील रेशीम उत्पादक शेतकरी सत्कार हरीभाऊ पगडे , धनगरवाडी ता. नांदेड, सईदखान आयुबखान, दिग्रस ता. हदगाव, आनंद बळीराम कदम मुगट ता. मुदखेड, दत्तराव आबाराव क्षिरसागर ता. आडगाव ता. लोहा , प्रभाकर व्यंकटी पांचाळ कोंडा ता. अर्धापूर , सर्व तालुक्यांचे तहसीलदार,

 उपविभागीय अधिकारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पोहरे, समतादुत अविनाश जोंधळे, विनोद पांचगे, तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक , पर्यवेक्षक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी , मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शेतकरी, संरपंच आदिं विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.   
रेशीम विकास अधिकारी श्री. ढावरे म्हणाले की, रेशीम शेती ही एक शास्वत स्त्रोत आहे.यामुळे शेतकऱ्यांची प्रगती होणार आहे. तुती लागवड कमी भांडलातून करता येते.  रेशीम शेती कशी करावी. तसेच त्यासाठी लागणारे वातावरणाविषयीची माहिती दिली.
परभणीचे डी. वैज्ञनिक ए.जे . कारंडे म्हणाले की, रेशीम अळीचे जीवनचक्र व किटक संगोपनाबाबतची माहिती दिली. भारतात तुती रेशीम, टसर रेशीम, एरी रेशी , मुगा रेशीम हे प्रकार आहेत. तसेच तुतीची लागवड , खते, तापमान तसेच शेतकऱ्यांना तुती लागवडीबाबत मार्गदर्शन केले.
प्रकल्प अधिकारी रेशीम श्री. पी.बी. नरवाडे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. मोटे यांनी तुती लागवडीचे संगोपन तसेच त्याला पोषक वातावरण व कृषि विभागामार्फत शेततळे , जलयुक्त अभियानामार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी तुती लागवडीबाबत तसेच अन्य अडचणींचा प्रश्नोत्तरे झाली. या कार्यक्रमात विभाग प्रमुखामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पांडूरंग मामीडवार यांनी केले . तर आभार रेशिम विकास अधिकारी पी. जी. पाटील यांनी मानले.

*****  

No comments:

Post a Comment