Thursday, November 23, 2017

राजमाता जिजाऊ स्वालंबन पुरस्कारासाठी
बँकर्सनी 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
            नांदेड, दि. 23 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत दरवर्षी अतिउत्कृष्ट व सक्षम बचतगटांना जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनामार्फत दिला जातो. जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य असलेल्या बँक शाखांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरुन संबंधित गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड यांचे कार्यालयात मंगळवार 28 नोव्हेंबर 2017 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रामुख्याने बँकेशी संबंधित असल्याने याअंतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता गटासंबंधी जिल्हास्तरावर सन 2016-17 साठी सर्वोत्कृष्ट काम असलेल्या व पतपुरवठ्याचे जास्तीतजास्त उद्दिष्ट साध्य केलेल्या एका बँक शाखेस प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...