Saturday, October 7, 2017

मानार नदीकाठच्या
नागरिकांना सतर्कतेचा इशारा  
नांदेड दि. 7 :-  उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी या धरणाचा जीवंत पाणीसाठा 71.46 टक्के इतका असून पाण्याचा येवा चालू आहे. सद्यस्थितीत अतिवृष्टीचा इशार देण्यात आला असल्यामुळे धरण केंव्हाही भरु शकते. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी दरवाजे उघडून मानार नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क रहावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे. 
त्यामुळे लिंबोटी, डोंगरगाव, हनमंतवाडी, चोंडी, दगडसांगवी, मजरेसांगवी, बोरी खुर्द, उंबरज, संगमवाडी, कोल्ह्याची वाडी, शेकापूर, अंबेवाडी, जंमलवाडी, बाळंतवाडी व घोडज या नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहून गुरे-ढोरे व इतर मालमत्ता सुरक्षीत राहील यादृष्टिने उपाययोजना करावी. तसेच लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्प लिंबोटी या धरणाचे जलाशय खोल असल्यामुळे जलाशयात कोणीही पोहण्यास जाऊ नाही, असेही आवाहन उपकार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment