Friday, September 1, 2017

जायकवाडी धरणातुन पाण्याचा विसर्ग झाल्यास
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नांदेड, दि. 1 :- जायकवाडी धरणाची पाणीपातळी 78 टक्‍के क्षमतेने भरली असुन पाऊस होत राहिल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा गोदावरी नदीत सोडण्‍याची शक्‍यता केंव्‍हाही निर्माण होऊ शकते. यामुळे जायकवाडी धरणातुन पाण्‍याचा विसर्ग सोडला असता, धरणाखालील भागातील गोदाकाठच्‍या गावांना पुराचा धोका होऊ शकतो. म्हणून गोदावरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सर्तकता बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 धरणातुन होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पुर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्‍याच्‍या सुचनाही देण्‍यात आलेल्या आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...