Friday, August 18, 2017

सुक्ष्म सिंचन संचासाठी शेतकऱ्यांनी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  
            नांदेड दि. 18 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना 2017-18 या वर्षासाठी सुक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांऑनलाईन नोंदणी करण्यास शेतकऱ्यांकडुन अर्ज स्वीकृती करण्यासाठी ई-ठिबक अज्ञावली दिनांक 1 मे 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 या कालावधीत सुरु राहणार आहे.  विहित पध्दतीत शेतक-यांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांनी केले आहे.
त्यानुसार शेतक-यांचे अर्ज ई-ठिबक अज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडुन अर्ज फक्त ई-ठिबक आज्ञावली www.mahaethibak.gov.in यासंकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीव्दारे स्विकारण्यात येतील. 
            सन 2017-18 मधील ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. स्वंयचलित संगणकीय प्रणालीव्दारे शेतक-यांना उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात ऑनलाईन पुर्वसंमती देण्यात आलेली असुन ज्या लाभार्थ्यांना पुर्वसंमती मिळालेली आहे, असे लाभार्थ्यांनी सुक्ष्म सिंचन संच उत्पादक अथवा त्यांचे प्राधिकृत विक्रेते / वितरकाकडुन त्यांच्या संतीच्या कंपनीचा संच खरेदी करावा प्रत्यक्षात त्यांचे क्षेत्रावर कार्यान्वीत करुन बिल ईनव्हाईस ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदवावे. अनुदान मागणीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा.
            लाभार्थी शेतक-यांने पुर्वमान्यता मिळाल्यानंतर सुक्ष्म सिंचन संचाची उभारणी करुन 30 दिवसाचे आत बिल ईनव्हाईस ऑनलाईन प्रणालीमध्ये भरल्यास लाभार्थीची पुर्वमान्यता संगणकीय प्रणालीव्दारे आपोआप रद्द होईल. त्यास पुन्हा नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहील.
अधिक माहितीसाठी संबंधीत कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क करावा किंवा कृषि विभागाचे अधिकृत स्थळ  www.mahaethibak.gov.in वर माहिती उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...