Saturday, August 12, 2017

मुदत बाहय बियाणे विक्रीमुळे
कृषि केंद्राचा परवाना निलंबीत
           नांदेड दि. 13 :- कोथिंबीरचे मुदत बाहय बियाण्याची विक्री करुन पावतीवर अंतिम मुदत दर्शविल्यामुळे बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन झाल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विकास कार्यालयाने अर्धापूर येथील सदगुरु ग्रो एजन्सीचा परवाना निलंबीत केला आहे.

अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील अवधुत राऊत यांच्या तक्रारीवरुन बियाणे निरिक्षक तथा कृषि अधिकारी श्रीमती जी. डी. स्वामी यांनी चौकशी केली. त्यानंतर बियाणे परवाना निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी बियाणे, खते किटकनाशकाबाबत तक्रारी असल्यास प्रत्यक्ष, दुरध्वनी 02462-230123, ईमेल, एसएमएस तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000, भरारी पथकाच्या फ्लेक्सवरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.                       00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...