Monday, July 3, 2017

नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवर
तात्काळ निकाली काढाव्यात -  जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :-  नागरिकांच्या तक्रारीचे स्थानीक पातळीवर दखल घेवून तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समिती बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषि, आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, नागरिकांना आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये सातत्याने यावे लागू नये, यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवर निराकरण झाले पाहिजे. आपले सरकार वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, दाखल तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती वेब पोर्टलवर अद्यावत करावी. त्यामुळे या तक्रारी प्रलंबीत दिसणार नाहीत. सेवा हमी कायदामुळे सामान्य नागरिकांना विहित कालावधीत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. हा कायदा लागू झाल्याने नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाईन देण्यावर अधिकाऱ्यांनी भर दयावा, असा सूचनाही श्री. डोंगरे यांनी दिल्या.  
या लोकशाही दिनी 55 तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत यंत्रणांना अनुषंगीक कार्यवाहीबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

0000000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...