Tuesday, May 30, 2017

धनगरवाडीत चला गावाकडे जाध्‍यास विकासाचा घेअभियान
                नांदेड,  दि. 30 :- औरंगाबाद विभागाचे आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्‍या संकल्‍पनेतील चला गावाकडे जाऊ ध्‍यास विकासाचा घे हे अभियान नांदेड तालक्‍यातील धनगरवाडी येथे 20 ते 29 मे 2017 या कालावधीत राबविण्यात आले. या गावात श्रमदानाचे काम करुन नागरीकांशी चर्चा करण्यात आली. गावातील अडीअडचणी जाणुन त्‍याचे निरसनही करण्‍यात आले.  
            या अभियानात वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यास सुरुवात करण्यात आली.  वृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनिकरण विभागामार्फत चारशे रोपे मोफत देण्‍यात येणार आहेत. मगांराग्रारोहयो अंतर्गत तती लागवडीसाठीचा प्रतिसाद पाहता तती लागवडीसाठी जिल्‍हा रेशीम विकास अधिकारी यांचे सहकार्याने मार्गदर्शन व प्रोत्‍साहन शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. त्‍यातून नविन 10 शेतक-यांची निवड करण्‍यात आली. यापूर्वी या गावातील 21 शेतक-यांनी तती लागवड सुरु केली आहे. या सर्व 31 शेतक-यांना व्‍हर्मी कंपोस्‍टींग व नाडेफबाबत मार्गदर्शन करुन ही कामे घेण्‍यास प्रोत्‍साह देण्‍यात आले. 
गाळमुक्‍त तलाव व गाळयुक्‍त शिवार या योजनेअंतर्गत गावा शेजारील कल्‍हाळ तलावातील गाळ काढण्‍याच्‍या कार्यक्रमास सुरुवात करण्‍यात आली. यासाठी शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्‍नत शेतकरी समृध्‍द शेतकरी या शासनाच्‍या पंधरवाडा अभियानांतर्गत कृषी विभागामार्फत कृषीच्‍या कामांचे मार्गदर्शन करण्‍यात आले. ज्‍यासाठीही शेतक-यांनी उत्‍साह दर्शविला.  
तसेच त्‍यासोबत शासनाच्‍या गाळमुक्‍त तलाव व गाळयुक्‍त शिवार आणि उन्‍नत शेतकरी समृध्‍द शेतकरी पंधरवाडा असे कार्यक्रम एकत्रित राबविण्‍यात आले. यावेळी तहसिलदार किरण अंबेकर, जिल्‍हा रेशीम अधिकारी श्री. नरवाडे, लागवड अधिकारी श्री. शेख, मंडळ कृषी अधिकारी श्री. घाटूळ यांनी मार्गदर्शन केले. 

000000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...