Monday, April 17, 2017

उष्‍णतेच्या लाटेबाबत नागरिकांना सतर्कता बाळगावी,
आरोग्याची काळजी घ्‍यावी  जिल्‍हा प्रशासन

     नांदेड, दि. 17 :- भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील कुलाबा वेधशाळेने मंगळवार 18 एप्रिल 2017 पासुन उष्‍णतेच्‍या लाटेची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविल आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना इशारा देतानाच, काळजी घेण्याचे आवाहन केले आहे..   
    या जाहीर आवाहनात जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की, उन्हापासून बचावाच्या उपाययोजना करण्याकडे लक्ष देण्यात यावे. उन्हामध्ये शरीराचे तापमान वाढल्याची शंका येताच, सावलीमध्ये बसणे आणि भरपुर पाणी पिणे असे उपाय करावेत. उष्‍माघाताचा रुग्‍ण आढळल्‍यास तात्‍काळ शासन रुग्‍णवाहीका 108 क्रमांकाशी संपर्क साधुन जवळच्‍या रुग्‍णालयात प्रथमोपचारासाठी पाठवावे, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे. उष्‍णतेच्‍या लाटेपासुन कोणत्‍याही प्रकारची जीवित‍हानी होऊ नये यासाठी महानगरपालिका आणि शासकीय आरोग्य यंत्रणेशी समन्‍वय साधुन उष्‍णतेच्‍या लाटेपासुन नागरीकांचे बचाव करावयाच्‍या तसेच यंत्रणा सज्‍ज ठेवावयाच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाव्‍दारे निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आहेत. उष्‍णतेची तीव्रता आणि तापमानात अचानक होणा-या  वाढीबाबत नागरीकांनी, शेतक-यांनी व विदयार्थ्‍यांनी सतर्कता बाळगावी.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...