Thursday, February 2, 2017

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे ,
पंचायत समितीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध
नांदेड दि. 2 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात दाखल करण्यात नामनिर्देशनपत्रांची आज छाननी करण्यात आली. छाननीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 640 उमेदवारांचे तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 892 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची आज तालुकानिहाय त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आल्याची माहिती ‍ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 63 गटासाठी 897 व पंचायत समितीच्या 126 गणासाठी 1 हजार 128 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती.   छाननी नंतर वैध ठरलेल्या जिल्हा परिषद गटासाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे ( कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 24 (1),  किनवट- अप्राप्त  , हिमायतनगर 38 (1) . हदगाव- 103 (3) अर्धापूर- 23 (2) नांदेड- 69 (1), मुदखेड- 13 (निरंक), भोकर- 45 (3), उमरी- 13 (निरंक), धर्माबाद- 31 (निरंक) , बिलोली- 62 (निरंक), नायगाव- 30 (3), लोहा- 46 (4), कंधार- 45 (निरंक), मुखेड- 45 (3), देगलूर-53 (निरंक). अशारितीने जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी किनवट वगळता 640 जणांची उमेदवारी वैध ठरली, तर 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
छाननी नंतर वैध ठरलेल्या पंचायत समिती गण निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची संख्या तालुहानिहाय पुढील प्रमाणे (कंसात उमेदवारी अवैध ठरलेल्यांची संख्या ) .
माहूर- 42 (1),  किनवट- अप्राप्त , हिमायतनगर 36 (निरंक) . हदगाव- 104 (निरंक) अर्धापूर- 32 (1), नांदेड- 74 (1), मुदखेड- 28 (निरंक), भोकर- 61 (1), उमरी- 35 (2), धर्माबाद- 34 (1) , बिलोली- 60 (1), नायगाव- 75 (निरंक), लोहा- 79 (2), कंधार- 81 (निरंक), मुखेड- 81 (निरंक), देगलूर- 70 (1) . अशारितीने पंचायत समिती गणांसाठी दाखल  किनवट वगळता 892 जणांची उमेदवारी वैध ठरली , तर 11 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले.
दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली. त्यानंतर वैध व अवैध नामनिर्देशनपत्रांची यादी  प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशनपत्राचा स्विकार किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे रविवार 5 फेब्रुवारी 2017 पर्यंत अपिल करता येणार आहे. या अपिलांवर जिल्हा न्यायाधीशांकडून सुनावणी व निकाल देण्याचा संभाव्य शेवटची मुदत बुधवार 8 फेब्रुवारी 2017 राहणार आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी बुधवार 8 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत जिथे अपील नाही तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00वाजेपर्यंत असेल. तर ही मुदत जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार आहे. यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप जेथे अपील नाही, तेथे मंगळवार 7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 नंतर होणार आहे. यादी व चिन्ह वाटप जेथे अपील आहे, तेथे शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर होणार आहे. मतदान केंद्राची यादीही शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment