Sunday, October 2, 2016

पूर परिस्थितीत अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 2 :- बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या मांजरा पाणलोट क्षेत्रात आज  झालेल्या अतिवृष्टीमुळे धोकादायक पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात व या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी अतिसर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे पाण्याची आवक वाढत असल्याने आणि 95 ते 100 टक्के जलसाठा निर्माण झाल्यास नांदेड जिल्ह्यातील इतर प्रमुख बंधाऱ्यातून अतिरिक्त जलसाठा वेळोवेळी विसर्ग करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व नदी-नाल्या काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचित करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे. मदत व तातडीच्या काळात स्थानीक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. पूर नियंत्रणासाठी सिंचन भवन नांदेड येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 02462-263870 असा आहे, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   392   23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद ; निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये   ·      लोकसभा...