Thursday, September 8, 2016

राष्ट्रीय विरता पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
          नांदेड, दि. 8 –  अपघातग्रस्त, संकटात सापडलेल्या व्यक्तीचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धाडसाने, शौर्याने जीव वाचविणाऱ्या मुलांचा गौरव करण्याच्यादृष्टीने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय विरता पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो. त्याअनुषंगाने 1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील वय 6 ते 18 वर्षाखालील बालकांनी अतुलनीय शौर्य दाखवून अलौकीक कार्य केलेले असेल अशा बालकांचे विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेशकृपा इमारत, शास्त्रीनगर नांदेड यांचेकडे शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000 

No comments:

Post a Comment