Tuesday, September 13, 2016

संवाद पर्व अभियानांतर्गत विविध योजनेची माहिती नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण
           नांदेड, दि. 13 :- शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हाती घेतलेल्या "संवाद पर्व"  अभियानांतर्गत नांदेड आकाशवाणी मालिकेतील चौथ्या भागात सौ. राजश्री हेमंत पाटील, सौ. अरुंधती पुरंदरे-साले, सौ. रेणुका तम्मलवाड व डॉ. मिरा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन 13 व 14 सप्टेंबर 2016 रोजी प्रसारण होणार आहे.   
          
  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय व आकाशवाणी केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "संवाद पर्व" अभियानांतर्गत विविध योजना विषयी माहिती देण्यासाठी मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. या मालिकेतील चौथ्या भागात बेटी बचाव बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री योजना, पीसीपीएनडीटी कायदा व प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम आदी योजनांविषयी गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील, माजी नगरसेविका सौ. अरुंधती पुरंदरे-साले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राच्या सहायक संचालक सौ. रेणुका तम्मलवाड, रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. मिरा कुलकर्णी यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.  
या कार्यक्रमाचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन आज मंगळवार 13 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 8.15 वाजता व त्याचे पूर्नप्रसारण बुधवार 14 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 वा. होणार आहे. याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणीचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 396

  जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन नांदेड दि.  30 :-  जिल्ह्यात आज ३० एप्रिल  व उद्या 1 मे 20...