Friday, August 29, 2025

 वृत्त क्रमांक 914

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानातर्गंत

 शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत 

नांदेड दि. 29 ऑगस्ट :- सन 2025-26 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान या नावाने राबविण्यात येत आहे. यामध्ये बायोचार या घटकांचा समावेश केला आहे. यासाठी केंद्र : राज्य 60 : 40 टक्के याप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्नधान्याच्या गरजेसोबतच नगदी पिकांचीही गरज भागविण्यासाठी कापूस पिकाचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कापूस अंतर्गत, बायोचार ही बाब नव्याने प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हास्तरावर 7 चे लक्षांक प्राप्त आहे.

उद्दिष्टे :- बायोचार वापरामुळे जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढून जमीनीची सुपिकता वाढवणे. शेतातील कापूस पिकाचे पऱ्हाट्याचा वापर करुन जमिनीतील कार्बनचे प्रमाणे वाढवून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविणे.लाभार्थी : वैयक्तिक लामार्थी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/ कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था.

अनुदान दर : 10 हजार रुपये प्रति युनिट किंवा खर्चाच्या 50 टक्के यापैकी निम्नतम दर. लाभार्थी निवड : लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलव्दारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल. लाभार्थी निवड झालेल्या व पुर्वसंमती प्राप्त होऊन बायोचार युनिट उभारण्यास तयार असणाऱ्या लाभार्थ्यांना एक दिवशीय प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, कृषी विदयापीठ, शासकीय संशोधन संस्था इ. मार्फत देण्यात येणार आहे.

तरी इच्छुक वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/ कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बायोचार या घटकासाठी महाडीबीटीवर अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...