Wednesday, January 3, 2018

नागरिकांनी संयम, शांतता राखावी
जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन
           
नांदेड, दि. 3 :- पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील घटनेच्‍या अनुषंगाने नागरिकांनी अफवा किंवा भुलथापांना बळी न पडता जिल्ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहील यादृ‍ष्‍टीने समजूतदारपणे संयम आणि शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
फेसबुक, व्‍हाटस्अॅप, टिव्टर अशा सोशल माध्यमावरील आक्षेपार्ह मजकूर तयार करणे, संग्रहीत करणे, प्रसारित करणे हा दखल पात्र स्‍वरुपाचा अपराध आहे. याप्रकारे  कोणत्‍याही प्रकारची अफवा शहरात पसरवत असल्‍याची माहिती प्राप्‍त झाल्‍यास तात्‍काळ पोलीस नियंत्रण कक्ष 02462-234720 या क्रमांकावर संपर्क साधावा.  अशा व्‍यक्तविरुद्ध कायदेशर कार्यवाही करण्‍यात येईल. यासंदर्भात कुठलीही बातमी व अफवावर विश्‍वास ठेऊ नये जिल्ह्यात सर्वांनी शांतता ठेवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले आहे.
00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...