वृत्त क्रमांक 834
हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान
महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग
नांदेड दि. 12 ऑगस्ट :- ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला.
जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळे अभियान उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी या मोहिमेत सहभागी होताना स्वतः महात्मा गांधी पुतळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनीही या मोहिमेत सहभागी होत ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालय येथेही आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणे ज्यामध्ये पुतळा परिसर, शासकीय कार्यालय, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.
यावेळी शहरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथही दिली.
या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, महसूल विभागाचे विभाग प्रमुख, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
00000



.jpeg)

.jpeg)


.jpeg)

No comments:
Post a Comment