Saturday, October 17, 2020

 

संभाव्य पावसापासून पिकांचे संरक्षण करण्याचे

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 17 :-परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेता दि. 17 ते 21 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

सद्यस्थितीत सोयाबीन, ज्वारी पिकांची काढणी व कापूस पिकाची वेचणी चालू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची वेळेत काढणी करून सुरक्षित स्थळी साठवणूक करून ठेवावी . ज्वारी व सोयबीन या पिकाचा ढीग करून ठेवला असल्यास व्यवस्थित झाकून ठेवावे. शक्य असल्यास लवकरात लवकर मळणी करून घ्यावी. शेतकरी बंधूनी शक्य असेल सर्वतोपरी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर बी चलवदे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक  994 उपवासाला भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन  नांदेड दि. 22 सप्टेंबर :- उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. भगर ख...